…तर पलिकडचे राधाकृष्ण विखे-पाटीलही आमच्याकडे येऊन बसतील -जयंत पाटील

…तर पलिकडचे राधाकृष्ण विखे-पाटीलही आमच्याकडे येऊन बसतील -जयंत पाटील

मुंबई – ईव्हीएमबाबत पुन्हा एकदा विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे ताकद असेल, हिंमत असेल तर पुढची विधानसभा निवडणूक जुन्या पद्धतीने बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. त्यानंतर जनता कुणाच्या मागे आहे हे तुम्हाला कळेल.कारण माहिती आहे ईव्हीएमचे प्रताप काय आहेत. तसेच तसं झालं तर पलिकडचे राधाकृष्ण विखे-पाटीलही आमच्याकडे येऊन बसतील असा टोमणा त्यांनी विखे पाटलांना लगावला आहे.

दरम्यान माझं या सरकारला आव्हान आहे. बॅलेट पेपरवर एकदा निवडणूक घेऊन दाखवावी. या सभागृहाचा ठराव करा आणि निवडणूूक आयोगाला येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची विनंती करा म्हणजे दूूध का दूध पानी का पानी होईल असंही जयंत पाटील यांनी विधानसभेत म्हटलं आहे. तसेच अजित पवार यांनीही जयंत पाटील यांच्या मागणीला समर्थन दिलं आहे. जयंत पाटील यांनी ईव्हीएमबाबत जी भूमिका मांडली आहे. त्याला माझं समर्थन असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS