मोदी आणि फडणवीसांना ‘पहिली कॅबिनेट’ हा रोग लागलाय -जयंत पाटील

मोदी आणि फडणवीसांना ‘पहिली कॅबिनेट’ हा रोग लागलाय -जयंत पाटील

कोल्हापूर –  भाजपने पाच वर्षांत जी आश्वासने दिली त्यातील एकही पूर्ण केलेले नाही. या सरकारने फसवलं अशी मानसिकता या देशातील आणि राज्यातील जनतेची झाली आहे असे मत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी मुदाळ येथील जाहीर सभेत मांडले.चोकशी, नीरव मोदी, मल्ल्या हे देशातील १० ते १५ हजार कोटी बुडवून फरार झाले परंतु आपण थोडेसे जरी कर्ज थकवलं तर ते सोडतील का ? असा सवालही सर्वसामान्य लोकांना आमदार जयंतराव पाटील यांनी केला.पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो असं मोदी म्हणाले.नदेवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला आरक्षण देतो सांगितले. मोदी आणि फडणवीसांना ‘पहिली कॅबिनेट’ हा रोग लागला असल्याचा असा आरोप आमदार जयंतराव पाटील यांनी केला.

एवढी खोटी आश्वासने देणारा देशाचा पंतप्रधान मी पाहिला नाही अशा शब्दात आमदार जयंतराव पाटील यांनी पंतप्रधान यांच्या घोषणांचा समाचार घेतला.नियोजन आयोगाचे अधिकार मोडीत काढला. नियोजन आयोग असता तर बुलेट ट्रेन करायला परवानगी दिली नसती, सीबीआयची वाट लावली, रिझर्व्ह बॅंकेच्या कारभारात ढवळाढवळ केली असा आरोपही आमदार जयंतराव पाटील यांनी केला.

पाच राज्यात पराभव झाल्यानंतर भाजपने सवर्णांना १० टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण देता येत नाही हे माहित असूनही आरक्षण दिले. हे सगळं निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केले जात असल्याचा आरोपही आमदार जयंतराव पाटील यांनी केला.एका बाजूला शेतीचा खर्च वाढतोय आणि पिकवलेल्या शेतीला बाजारभाव मिळत नाहीय. त्यामुळे हे सरकार बदलायचे आहे त्यासाठी ही परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे असेही आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले.

पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे सांगतानाच भुदरगड, राधानगरी, आजरा या तालुक्यातील आणि परिसरातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन आमदार जयंतराव पाटील यांनी दिले.

भाजप सरकारने केलेल्या फसव्या घोषणाबाबत लोकांमध्ये काय भावना आहेत हे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी ‘हो’ की ‘नाही’ या प्रश्नातून जाणून घेतल्या. त्यावेळी जनतेने भाजप सरकारविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भाजपची खोटी आश्वासने, घोटाळे याबाबतची माहिती ऑडिओ क्लीप वाजवून आणि व्हिडिओ क्लीप दाखवली. या संकल्पनेला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

COMMENTS