सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे – जयंत पाटील

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे – जयंत पाटील

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल धुळे दौ-यावर गेले होते यादरम्यान मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांनी कोठडीत डांबलं होतं. यावरुन जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात कुठेही मुख्यमंत्री गेले तर आंदोलन करण्याच्या भीतीने बर्‍याच लोकांना कोठडीत डांबलं जातं. धर्मा पाटील यांच्या मुलाला आणि आईला काल तुरुंगात डांबलं. धुळे, सांगली दौ-यात हेच केलं.आणीबाणीत जे होत नव्हतं ते या सरकारमध्ये होत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान राज्यात पोलीस बळाचा अतिवापर लोकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. सरकारने बाजारात उतरून चढ्या दराने कांदा खरेदी सुरू केल्याशिवाय कांद्याचे दर सुधारणार नाहीत. राज्य सरकारने लवकर याबाबत निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात एकाच शेतकऱ्यांला अवकाळी पावसाचा फटका बसला असा सरकारचा अहवाल आहे. त्यामुळे सरकारने ही शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. अनेक जिल्ह्यात 4 ते 5 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचे सरकार सांगत असल्याचंही यावेळी जयंत पाटील म्हणालेत.

COMMENTS