राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काढणार ‘निर्धार परिवर्तनाचा रॅली’ – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काढणार ‘निर्धार परिवर्तनाचा रॅली’ – जयंत पाटील

मुंबई – हल्लाबोल यात्रेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निर्धार परिवर्तनाचा रॅली काढणार आहे. 10 जानेवारीपासून या रॅलीला सुरुवात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. या रॅलीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडपासून सुरुवात होणार आहे. महाडला पहिली सभा पार पडणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

या रॅली दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारचा पर्दाफाश करणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 10 फेब्रुवारी पर्यंत ही यात्रा सुरु राहणार असून राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सभा घेणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारनं जनतेची फसवणूक केली असून आगामी निवडणुकीत जनात सरकारला दाखवून देईल असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS