मीच नाईक, निंबाळकरांच्या समर्थकांना कालवा समितीतून वगळले, त्यात काय प्रॉब्लेम ?- जयंत पाटील

मीच नाईक, निंबाळकरांच्या समर्थकांना कालवा समितीतून वगळले, त्यात काय प्रॉब्लेम ?- जयंत पाटील

पुणे – पुण्यात कालवा समितीची बैठक पडली. याबैठकीला अजित पवार यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थिती होते. या बैठकीआधी माढ्याचे खासदार असलेल्या नाईक निंबाळकर यांनी पाटील यांनी माझ्या समर्थकांना कालवा समितीतून वगळल्याचा आरोप केला होता. कालवा समितीतून एकूण चार  लोकांना वगळण्यात आले,असून त्यात आमदार जयमकुमार गोरे, श्रीकांत देशमुख,विश्वास भोसले, माजी सनदी अधिकारी ,उत्तमराव जानकर यांचा समावेश आहे. नीरा डाव्या कालव्याच्या निर्णयामुळे आम्हाला वगळण्यात आलंय, असा आरोप जयकुमार गोरे यांनी केला. बारामतीशी इमान राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान या आरोपांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले असून मीच नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांना कालवा समितीतून वगळले, त्यात काय प्रॉब्लेम आहे असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच त्यांची उपयोगिता दिसली नाही, मी त्या खात्याचा मंत्री आहे, माझ्या सांगण्यावरून वगळले असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत.

o

दरम्यान भाजपचे सरकार असताना निंबाळकर यांच्या आग्रहावरून बारामती मतदारसंघात जाणारे नीरा देवघर प्रकल्पाच चाळीस टक्के पाणी माढ्यात वळवण्यात आले होते. हे पाणी परत फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर भागाला मिळणार आहे. पाणी पळवल्यावरून निंबाळकर यांनी थेट बारामतीकरांना अनेकदा लक्ष केले होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर निंबाळकर समर्थकांनाच कालवा समितीतून नारळ देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नीरा देवघर पाण्यावरुन राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS