खेकड्यांना पोलिसांच्या ताब्यात देत आव्हाडांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली !

खेकड्यांना पोलिसांच्या ताब्यात देत आव्हाडांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली !

ठाणे – राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आज चक्क खेकडे घेऊन नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी आव्हाड यांनी खेकड्यांना पोलिसांच्या ताब्यात देत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मंत्री तानाजी सावंतांच्या खेकड्यांबाबतच्या विधानानंतर आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्याच्या दुर्घटनेत 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटलं, असं ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांचं मत असल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला.

त्यामुळे सावंतांवर आता सर्व स्तरातून टीका होत आहे. तानाजी सावंत हे स्थानिक आमदारांचा बचाव करत आहेत. स्वत:च्या भष्ट्राचाराचं खापर खेकड्यांवर फोडण्याचं काम सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

दरम्यान पूर्वी उंदिर हा भाजप सरकारमधील महत्त्वाचा घटक होता. आता त्यामध्ये खेकडेदेखील आहेत. खेकडे आणि उंदिर आता भाजपला वाचवायला निघाले आहेत. असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

COMMENTS