“कशा राहतील यांच्या राज्यातील महिला सुरक्षित ?”  जितेंद्र आव्हाड आमदार राम कदमांवर बरसले !

“कशा राहतील यांच्या राज्यातील महिला सुरक्षित ?” जितेंद्र आव्हाड आमदार राम कदमांवर बरसले !

मुंबई – भाजपाचे आमदार राम कदम यांनी काल घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवादरम्यान महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राम कदम यांचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. यामध्ये कदम यांनी गोविंदाना तुम्हाला पसंत असलेली मुलगी पळवून आणून तुम्हाला देणार असे वक्तव्य केल्याचे दिसते. ‘साहेब मी तिला प्रपोज केलं ती मला नाही म्हणतेय मला मदत करा’, या कामासाठीही मी तुमची मदत करायला तयार आहे, असे राम कदम यांनी सांगितले. यावर उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे लक्षात येताच राम कदम यांनी स्पष्टीकरणही दिले. ‘मी शंभर टक्के मदत करणार. आधी तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायचं. तुमचे आई-वडील म्हटले आम्हाला ही पोरगी पसंत आहे. तर काय करणार मी? तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार’ असे त्यांनी सांगितले. यावेली त्यांनी आपला फोन नंबर दिला.

दरम्यान राम कदम यांच्या या वक्तव्यावर आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. ‘बेताल वक्तव्य करणारा भाजपा नेत्यांमध्ये आणखी एकाची भर. रक्षाबंधन, दहिकाला उत्सव या पवित्र सणांच्या दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे! तसेच कशा राहतील यांच्या राज्यात महिला सुरक्षित? असा सवाल आव्हाड यांनी ट्वीटरवर केला आहे.

COMMENTS