बीएमसीत ज्यांची सत्ता आहे, त्यांनीच मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार केलं – कपिल पाटील

बीएमसीत ज्यांची सत्ता आहे, त्यांनीच मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार केलं – कपिल पाटील

मुंबई – विधान परिषदेतील आमदार कपील पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. बीएमसीत ज्यांची सत्ता आहे, त्यांनीच मराठी माणसाला मुंबईतून हुसकावून लावून बदलापूरच्या हद्दीत ढकललं असल्याचं कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या हाती सत्ता आहे, पण मुंबई महापालिका मराठीत बोलत नाही. मराठीत व्यवहार करत नाही. मराठी भाषेचं आणि मराठी माणसाचं सर्वात जास्त नुकसान मराठी भाषेच्या नावाने सत्तेवर आलेल्यांनीच केलं असल्याचं कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. ते विधान परिषदेत बोलत होते.

तसेच मराठी भाषा सक्तीचा कायदा शाळांच्या आधी महापालिका आणि राज्यकारभाराला लावण्याची मागणीही कपिल पाटील यांनी केली. मुंबईतील 190 प्राथमिक मराठी शाळांना सेनेची सत्ता असलेली महापालिका एक रुपयाही अनुदान देत नसल्याचं कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच अहिराणी, खान्देशी, माडिया, गोंडी, गोरमाटी, मालवणी, वऱ्हाडी, सामवेदी, वाडवळी आदी बोली भाषांच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापित करा. मराठी शाळा बंद करून, मराठी भाषा भवन बांधण्याची दांभिक मागणी बंद करा तसेच अभिजात दर्जा मिळेल तेव्हा मिळेल. बहुजात मराठी संपवण्याचा डाव आधी बंद करा असंही यावेळी कपिल पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS