अर्जुनाच्या हाती बाण आला की वध दानवाचा होणार, अर्जुन खोतकरांचा रावसाहेब दानवेंना टोला !

अर्जुनाच्या हाती बाण आला की वध दानवाचा होणार, अर्जुन खोतकरांचा रावसाहेब दानवेंना टोला !

जालना  राज्याचे दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना टोला लगावला आहे. “अर्जुनाच्या हाती बाण आला की वध दानवाचा होणार,” असा त्यांनी टोला लगावला आहे. तसेच जालन्यातील भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यास मी तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौ-यावर आहोत. यादरम्यान त्यांनी जालन्याला भेट दिली असून जालन्यात शिवसेनेच्या उमेदवारांची चाचपणी केली आहे. या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अर्जुन खोतकर यांच्या नावाची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. त्यामुळे मराठाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे या आठ मतदारसंघात कोणाला कुठे संधी मिळणार याकडे लक्ष लागलं असून मराठवाड्यासह ते  सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार  असल्याची माहिती आहे.

COMMENTS