भेटीनंतर दिलीप गांधी आणि राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया !

भेटीनंतर दिलीप गांधी आणि राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया !

अहमदनगर – लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या न्वडणुकीच्या तोंडावर  अहमदनगरमध्ये काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार दिलीप गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तरय्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.  सुजय विखे यांना भाजपनं उमेदवारी देऊन  दिलीप गांधी यांचं तिकीट कापलं आहे. त्यामुळे नाराज असेलेल्या दिलीप गांधींची राधाकृष्ण विखेंनी भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विखे पाटील यांची प्रतिक्रिया

बरेच दिवस भेट झाली नसल्यामुळे ही भेट घेतली असून  ही सदिच्छा भेट असल्याचे विखे पाटलांनी सांगितलय. तर हे घर माझंच असून आमचा जुना स्नेह असल्याचे विखे म्हणाले. तसेच राजकारणाची चर्चा झाली नसल्याचा दावा विखेंनी केला. तसेच मी राष्ट्रवादीचे काम करणार नसल्याची भूमिका विखेंनी कायम ठेवली आहे.

दरम्यान दिलीप गांधी यांनी मात्र ही भेट राजकीय असल्याचे म्हटलं आहे. वर्षानुवर्षे आम्ही एकत्र काम केलं तर विखेंच चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपाचे उमेदवार आहेत. त्या अनुषंगाने अनेक चर्चा झाल्याचे गांधी यांनी सांगितले. त्याचबरोबर मी भाजपचाच प्रचार करणार असल्याचे गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.

COMMENTS