मुंबईला दूध कमी पडणार नाही, 15 दिवस पुरेल एवढा दुधाचा साठा – महादेव जानकर

मुंबईला दूध कमी पडणार नाही, 15 दिवस पुरेल एवढा दुधाचा साठा – महादेव जानकर

मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेल्या आंदोलनाचा कोणताही परिणाम मुंबईवर होणार नसल्याचं वक्तव्य दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे. मुंबईला 15 दिवस पुरेल एवढा दुधाचा साठा आहे, तशी राज्य सरकारने तयारी केली केली असल्यामुळे मुंबईला दूध कमी पडणार नसल्याची माहिती जानकर यांनी दिली आहे.

दरम्यान आंदोलने काय सुरू आहेत ते मला माहीत आहे. अमरावतीला रिकामा टँकर जाळला. पश्चिम महाराष्ट्रात फक्त काही ठिकाणी आंदोलने झाले नुकसान झाले आहे पण बाकीच्या ठिकाणी या आंदोलनाचा काहीही फरक पडलेला नसल्याचंही जानकर यांनी म्हटलं आहे. तसेच राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्याबाबतीत राजकारण करू नये असं मी त्यांना आवाहन करत असल्याचंही यावेळी जानकर यांनी म्हटलं आहे. ते नागपुरातील पावसाळी अधिवेशनादरम्यान बोलत होते.

COMMENTS