केरळसाठी महाराष्ट्राकडून 20 कोटींची मदत जाहीर !

केरळसाठी महाराष्ट्राकडून 20 कोटींची मदत जाहीर !

मुंबई – केरळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणची गावं आणि शहरं पाण्याखाली गेली आहेत. या भीषम पावसामुळे अनेकांचे बळी देखील गेले आहेत. तसेच अनेक ठिकाणी अजूनही काही लोक अडकून पडले असून अन्न-पाण्यावाचून लोकांचे हाल होत आहेत. याबाबत केंद्र सरकारनं केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर केली आहे. तर महाराष्ट्राकडूनही केरळसाठी मदत जाहीर करण्यात आली असून 20 कोटी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली असून केरळला आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी शुक्रवारपासून महाराष्ट्र सरकार केरळ प्रशासनाच्या संपर्कात असणार आहे. तसेच केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एमसीएचआय-सीआरईडीएआयने दीड कोटी रुपयांची अन्नाची पाकिटे पाठवली पाठवण्यात आली असून राजस्थानी वेलफेअर असोशिएशन आणि जितो इंटरनॅशनलने प्रत्येकी ५१ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच आतापर्यंत ११ टन अन्नाची व्यवस्था करण्यात आली असून त्यातील ६ टन अन्न आज संध्याकाळी पाठवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS