महाविकास आघाडी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता, राज्यात नवे वीज धोरण आणणार ?

महाविकास आघाडी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता, राज्यात नवे वीज धोरण आणणार ?

मुंबई – महाविकास आघाडी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता असून सरकारनं राज्यात नवे वीज धोरण आणण्याची तयारी केली आहे. राज्यात सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. याबाबतचे धोरण लवकरच आणण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत विधानपरिषदेत केली आहे. त्यामुळे दिल्लीनंतर आता मगाराष्ट्रातही सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान राज्यातला वीजदर कमी व्हावा, यासंदर्भात अभ्यास करून हे नवे वीज धोरण राज्यात आणले जाईल. तसेच त्यात १०० युनिटपर्यंत मोफत वीज देणे आणि शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी चार तास वीज देण्याचं प्रस्तावित असल्याचं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधान परिषदेत एका लक्षवेधीला उत्तर देताना म्हटलं आहे. तसेच घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी एक समिती अभ्यास करत आहे. या समितीचा अहवाल तीन महिन्यांत प्राप्त झाल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS