पंतप्रधान मोदींनी ‘तो’ सल्ला स्वतः अंमलात आणावा – मनमोहन सिंह

पंतप्रधान मोदींनी ‘तो’ सल्ला स्वतः अंमलात आणावा – मनमोहन सिंह

नवी दिल्ली  पंतप्रधान नरेंद्र मोदी मला जो सल्ला देत होते, तोच सल्ला त्यांनी अंमलात आणावा असं वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी केलं आहे. उन्नाव आणि कठुआ गँगरेप प्रकरणी अनेक दिवस मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी ही टीका केली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं असून तसेच यावेळी बोलत असताना त्यांनी मला आनंद आहे की मोदींनी अखेर या प्रकरणांवर मौन सोडलं आहे. त्यामुळे त्यांनी भारताच्या मुलींना न्याय मिळेल आणि दोषींना सोडणार नाही हे दिलेलं आश्वासन पाळावं असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान नरेंद्र मोदी मला कायम बोलण्याचा सल्ला देत असत, आता त्यांनी त्या सल्ल्यावर अंमलबजावणी करायला हवी. माझ्या न बोलण्यावर ते कायम टीका करत होते, हे मला मीडियातून समजलं आहे. पण जो सल्ला ते मला देत होते, त्यावर त्यांनी स्वत: अंमलबजावणी करायला हवी.””दोन्ही प्रकरणांवर उशिरा भाष्य केल्याने दोषी वाचू शकतात अशी नागरिकांची भावना झाली होती. जे सत्तेत आहेत, त्यावर त्यांनी त्याचवेळी बोलायलं हवं, असं मला वाटतं असंही मनमोहन सिंह यांनी म्हटलं होते.

COMMENTS