वाजपेयींमुळेच मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलो, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी जागवल्या आठवणी !

वाजपेयींमुळेच मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलो, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी जागवल्या आठवणी !

मुंबई –  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी देखील वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्यामुळेच मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलो असल्याचं जोशी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजप आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच मी लोकसभेचा अध्यक्ष झालो पण तिथेच नाही तर महाराष्ट्रतही मी त्यांच्यामुळे मुख्यमंत्री झालो असल्याचं मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे. तसेच मी लोकसभा अध्यक्ष होईन असं मला वाटलच नव्हतं. पण भाजप आणि वाजपेयींनी लोकसभा अध्यक्षाबाबततची भूमिका कायम ठेवली. त्याचा मला फायदा झाला होता. वाजपेयींची ही भूमिका नसती तर मी अध्यक्ष झालो नसतो असही यावेळी मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS