“वाघाचं आणि सिंहाचं राज्य असताना मंत्रालयात उंदरांचा घोटाळा !”

“वाघाचं आणि सिंहाचं राज्य असताना मंत्रालयात उंदरांचा घोटाळा !”

बदलापूर – राज्यात वाघाचं आणि सिंहाचं राज्य असताना मंत्रालयात उंदरांचा घोटाळा झाली असल्याची जोरदार टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. तसेच अशा ५६ इंचाच्या छातीचं करायचं काय? असा सवालही आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. लालू प्रसाद यादव चारा घोटाळा केला म्हणून तुरुंगात आहेत, आणि महाराष्ट्रात मात्र उंदीर घोटाळा होत असून मुख्यमंत्र्यांनी कदाचित चहाचा अनुशेष भरून काढला असावा अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली आहे.

दरम्यान ३ एकर जागेसाठी खडसेंना बाहेर काढलं जातं, आणि दुसरीकडे नारायण राणेंसारख्या माणसाला तुम्ही राज्यसभेवर पाठवता, याला काय म्हणायचं? असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. बदलापूरमधील एका कार्यक्रमात बोलत असताना बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. उंदीर घोटाळ्यासह मुख्यमंत्र्यांच्या कार्यलयातील चहा घोटाळा आणि एकनाथ खडसेंवरुन आमदार बच्चू कडून यांनी शिवसेन-भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

COMMENTS