अखेर साहित्य संमेलनाच ठिकाण ठरलं

अखेर साहित्य संमेलनाच ठिकाण ठरलं

औरंगाबाद – अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेन कुठे घ्यायचे यावरून मागील काही दिवसांपूर्वी संभ्रम निर्माण झाला होता. अनेक चर्चा आणि विचारविनियमन झाल्यानंतर हे ९४ वे साहित्य संमेलन नाशिकमध्ये घेण्याचे निश्चित झाले असून तशी घोषणा करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकलाच होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केली. हे संमेलन २०२०-२१च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत.

९४व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचं एक आणि अंमळनेरवरुन एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवले होते, यामध्ये मे महिन्यांत दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्विकारत ९४व्या साहित्य संमेलनासाठी निवड झाली. दरम्यान, गेल्या वर्षीचं ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये पार पडलं होते. गेल्या आठ वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे मराठवाड्यात साहित्य संमेलन घेतले जावे अशी मागणी होत होती.

COMMENTS