मराठी साहित्यिकांची शेतकरी आंदोलनात उडी

मराठी साहित्यिकांची शेतकरी आंदोलनात उडी

मुंबई – केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांन आता मराठीतील दिग्गज साहित्यिकांनीही पाठींबा दर्शवला आहे. सरकारकडून अमानुषपणे शेतकऱ्याचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या साहित्यिकांनी केला आहे. ज्येष्ठ साहित्यिक महेश एचकुंचवार, वसंत आबाजी डहाके, रा. रं. बोराडे आणि आसाराम लोमटे आदींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी  कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून सगळे शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने दिल्लीत एकवटले आहेत. सुरुवातीला या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. कडाक्याच्या थंडीत सुद्धा त्यांच्यावर पाण्याचे फवारे, अश्रुधूरांच्या नळकांड्या आणि लाठी हल्ला या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या.  त्यामुळे या आंदोलनाची धग देशभरात पोहचली आहे.

या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना, शेतमजूर व कामगार संघटनांच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालायवर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच ठिकठिकाणी रास्तारोको करण्यात येणार आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी काॅंग्रेसच्यावतीनेही राज्यव्यापी आंदोलन करण्यात करण्यात येणार आहे

COMMENTS