मुख्यमंत्री तुम्हीच मुंबईच्या विकासात खडा टाकत आहात- फडणवीस

मुख्यमंत्री तुम्हीच मुंबईच्या विकासात खडा टाकत आहात- फडणवीस

मुंबई – मुंबई हायकोर्टाने दिलेला आदेश ही राज्य सरकारला मोठी चपराक आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच या आरेतील जागेला मंजुरी दिलेली आहे. यामुळे आता तरी इगो सोडून आरेमध्येच काम करावे लागणार आहे. अधिवेशनातदेखील मी हीच भूमिका मांडली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी मिठाचा खडा का टाकता असे बोलले होते, पण आता तुम्हीच मुंबईच्या विकासात खडा टाकत आहात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

मुंबई उच्च न्यायालायने कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले. परिस्थिती जैसे थे ठेवा असे आदेश न्यायालयाने आज (बुधवार) एमएमआरडीएला दिले आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या दणक्यानंतर  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

फडणवीस म्हणाले, ‘विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करायला नको. मुंबईच्या विकासासाठी काम ही कामे करायला हवीत. मेट्रोच्या कामासाठी लाणारा पैसा हा जनतेचा, सर्वांचाच आहे. कारशेडचे काम त्वरित सुरू केले नाही तर प्रकल्प 2024 पर्यंत लांबेल. राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अटट्हास का आहे? असा प्रश्न फडणवीसांनी विचारला आहे.

 

COMMENTS