उद्धव ठाकरेंना मनसेच्या पोस्टवरुन खोचक शब्दात शुभेच्छा !

उद्धव ठाकरेंना मनसेच्या पोस्टवरुन खोचक शब्दात शुभेच्छा !

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मनसेनं अयोध्या वारीसाठी खोचक शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. दसरा मेळाव्यात अयोध्येला जाण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावरुनच मनसेनं उद्धव ठाकरे यांना खोचक शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.अयोध्यावारीसाठी तुम्हाला शुभेच्छा पण अयोध्येला जाऊन राज्यातील विविध प्रश्न सुटणार का असा सवाल मनसेनं केला आहे.

पोस्टरवरुन मनसेचे शिवसेनेला प्रश्न

1) महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त होणार का?
2) महागाई कमी होणार का?
3) महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का?
4) बेरोजगारांना रोजगार मिळणार का?
5)शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का?
6) शेतीमालाला हमी भाव मिळणार का?
7) महाराष्ट्रातील दुष्काळ संपणार का?
8) मोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का?
9) महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का?
10) खिशातील राजीनामे बाहेर पडणार का?

असे विविध सवाल मनसेनं उद्धव ठाकरे यांना केले आहेत.

COMMENTS