आडमुठेपणा केल्यास संघर्ष अटळ, राज ठाकरेंचा इशारा !

आडमुठेपणा केल्यास संघर्ष अटळ, राज ठाकरेंचा इशारा !

मुंबई – कोस्टल रोडवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वरळी कोळीवाड्यातील मासेमारांचा रस्ता अडवला जाऊ नये म्हणून महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच याप्रकरणी सामंजस्याने तोडगा निघायला हवा, आडमुठेपणा केल्यास संघर्ष अटळ असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

दरम्यान कोस्टल रोड वरळी येथे सागरी सेतूला जोडण्यासाठी समुद्रात खांब उभारला जाणार आहे. त्यामुळे कोळीवाड्यातील मासेमारी नौकांना अडथळा येणार आहे. दुसऱ्या बाजूला खडक असल्याने तेथून नौका घेऊन जाता येणार नाहीत. पूर्वी हा खांब बांधण्यात येणार नव्हता; मात्र खांब बांधण्याचा निर्णय झाल्याने त्याविरोधात मच्छीमारांनी आंदोलन सुरू केले आहे.

राज ठाकरे यांनी रविवारी या आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रश्‍नी सोमवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी चर्चा करणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS