“ 12 वर्ष मोठ्या तळमळीने मनसेसाठी काम केलं, परंतु श्रेय मात्र वरिष्ठांना मिळालं, त्यामुळेच पक्ष सोडला !” VIDEO

“ 12 वर्ष मोठ्या तळमळीने मनसेसाठी काम केलं, परंतु श्रेय मात्र वरिष्ठांना मिळालं, त्यामुळेच पक्ष सोडला !” VIDEO

मुंबई – 12 वर्ष पक्षासाठी मोठ्या तळमळीने काम केलं. अनेक कार्यकर्ते जोडली परंतु त्याचं सर्व श्रेय वरिष्ठ नेत्यांना मिळालं. त्यामुळे मनसेला रामराम ठोकला असल्याचं वक्तव्य मनसेचे कांदिवली-चारकोप येथील भाबरेकर नगरचे शाखाप्रमुख उत्तम पवार यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तम पवार यांनी भारिप बहूजन महासंघात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी मनसे सोडण्याचं कारण सांगतिलं आहे. तसेच आगामी निवडणुकीत या मतदारसंघात भारिप भारी पडणार असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS