आंबे खाऊन मुलंच का होतात?, मुली का नाही ?  – विद्या चव्हाण

आंबे खाऊन मुलंच का होतात?, मुली का नाही ? – विद्या चव्हाण

नागपूर – विधानपरिषदेत आज विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला असल्याचं पहावयास मिळालं असून संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे. प्रश्नोत्तराचा तासादरम्यान भीमा कोरेगांव प्रकरणावर प्रश्नोत्तरे सुरु होती. यावेळी विरोधकांनी या मागणीला जोर देत विधानपरिषदेत गोंधळ घातला असल्याचं पहावयास मिळालं.

दरम्यान संभाजी भिडे यांनी आंबे खाल्ल्यावर मुलं होतात असं वक्तव्य केलं होतं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी वक्तव्य केलं असून संभाजी भिडे म्हणतात आंबे खाऊन मुलं होतात, मग मुलंच का होतात? मुली का नाही, मुलींना त्यांचा विरोध आहे का ? असा सवाल विद्या चव्हाण यांनी केला आहे.त्यावेळी विद्या चव्हाण यांचं हे वक्तव्य  ऐकूण सभागृहात जोरदार हशा पिकला होता. दरम्यान विरोधकांनी केलेल्या या गोंधळानंतर पाच मिनीटांसाठी विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं.

COMMENTS