काँग्रेस प्रवेशानंतर पोटनिवडणूक लढवण्याबाबत काय म्हणाले नाना पटोले ?

काँग्रेस प्रवेशानंतर पोटनिवडणूक लढवण्याबाबत काय म्हणाले नाना पटोले ?

यवतमाळ – नाना पटोले यांनी गुरुवारी घरवापसी केली आहे. दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. घरवापसी केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली असून घरी परतल्याचा आनंद झाला असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच पोटनिवडणूक लढवण्याबाबत विचारलं असता याबाबत राष्ट्रीय नेतृत्व जो आदेश देईल त्याचं पालन करु असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शेतकरी आत्महत्यांबाबत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून मोदी आणि फडणवीस सरकारच्या सत्ताकाळात शेतकरी आत्महत्या वाढल्या असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच काँग्रेसने शेतकरी प्रश्नांवर घेतलेली गॅप भरून काढणार असल्याचं आश्वासन राहुल गांधींनी दिलं असून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच भाजप सरकार पडणार असून त्यासाठी माहूर शक्तिस्थळावर देवीला साकडं घालणार असल्याचंही पटोले यांनी म्हटलं आहे.

COMMENTS