डोक्यात हवा गेल्यानच मनसेचं नुकसान, बाळा नांदगावकर यांची कबुली !

डोक्यात हवा गेल्यानच मनसेचं नुकसान, बाळा नांदगावकर यांची कबुली !

अहमदनगर – मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज अहमदनगरमध्ये आढावा बैठक घेतली. त्यावेळी नांदगावकर यांनी मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाचा आलेख लगेच वाढल्याने आमच्या डोक्यात हवा गेली होती अशी कबुली दिली आहे. तसेच त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं असल्याचंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे. लोकांच्या विश्वासाला पात्र न झाल्याने आमचा आलेख ढासळला. त्यामुळे अलेख हळूहळू वाढला आसता तर बरं झालं असतं असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात सध्या तरी आमची भूमिका ‘एकला चलो’ची असून भविष्यात नेमकं काय होईल, हे सांगता येत नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, 20 एप्रिलपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांकडून सध्या राज्यभरात आढावा बैठकी सुरु आहेत. बाळा नांदगावकरी ठिकठिकाणी आढावा बैठक घेत आहेत. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी अहमदनगरमध्ये आढावा बैठक घेतली आहे. त्यावेळी त्यांनी डोक्यात हवा गेल्यामुळे मनसेचं मोठं नुकसान झालं असल्याची कबुली दिली आहे.

COMMENTS