शिवसेना का सोडली ? नारायण राणेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट !

शिवसेना का सोडली ? नारायण राणेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट !

मुंबई – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं आहे. त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. शिवसेना का सोडली ?  याचं स्पष्टीकरणही नारायण यांनी दिलं आहे. राणेंना शिवसेनेत ठेवलं तर मी घर फोडेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता. मी आणि रश्मी मातोश्री सोडू असा इशाराही उद्धव यांनी बाळासाहेबांना दिला होता असाही दावा नारायण राणे यांच्या आत्मचरित्रात करण्यात आला आहे.

शिवेसनेतील चुकीच्या गोष्टींवर मी बोट ठेवलं तेंव्हा मला काढण्यासाठी उद्धव यांनी प्रयत्न केले. त्यानंतर मी जेंव्हा शिवसेनेचा राजीनामा दिला. दुस-या दिवशी बाळासाहेबांचा मला फोन आला. तुझा राग कमी झाला का ? राजीनामा देण्याचा फेरविचार कर असाही सल्ला बाळासाहेबांनी दिला होता. मात्र जेंव्हा मला बाळासाहेबांचा फोन मला आला होता. हे उद्धव ठाकरेंना समजंल. तेंव्हा त्यांनी बाळासाहेबंना इशारा दिला की जर राणे शिवेसनेत राहणार असतील तर मी आणि रश्मी मातोश्री सोडू. राणेंच्या आत्मचरित्राची काही पाने एबीपी माझाच्या हातत आली आहेत. त्यांनी हे वृत्त दिलं आहे.

COMMENTS