“आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, नंतर राम मंदिराचं बोला”

“आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, नंतर राम मंदिराचं बोला”

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजपवर आणि मोदी सरकावर जोरदार हल्लाबोल केला. यापूर्वीही उद्धव यांनी यावरुन मोदींविरोधात टीका केलेली आहे. पण काल त्यांनी राम मंदिराच्या प्रश्नावरुन अयोद्धेत जाणार असल्याची घोषणा केली आणि येत्या 25 नोव्हेंबरला अयोद्धा दौ-याची घोषणा केली. शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे यांनी यावरुन उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा आणि नंतर राम मंदिराबाबत बोला असा टोलाच राणेंनी उद्दव यांना लगावला आहे.

राम मंदिराच्या प्रश्नावरुन त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही राणेंनी निशाणा साधला आहे. मोहन भागवत यांनीही उद्गार चिन्हात का बोलावं, त्यांनी तर सरकारला आदेश द्यायला हवेत असंही राणे म्हणाले. यापूर्वी भाजपला निवडणुक आली की राम मंदिराची आठवण होत होती आता शिवसेननेलाही निवडणुक आली की रामंदिराची आठवण झाली आहे अशीही टीका राणे यांनी केली आहे. उध्दव ठाकरे यांनी काल केललं भाषण म्हणजे किर्तनकार येऊन किर्तन करून गेल्यासारखं वाटलं असा टोलाही राणेंनी लगावला. उद्धव ठाकरेंनी राम मंदीर बांधण्याची तयारी दाखवावी, काय तयारी आहे त्यांची ? गेले ३ वर्ष उद्धव ठाकरेंनी राम मंदीराचा विषय काढला नाही, आता लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा राम मंदीराचा विषय काढला आहे असा आरोपही राणे यांनी केला आहे.

COMMENTS