मोदी यांनी लस टोचून घ्यावी – नवाब मलिक

मुंबई: देश करोना लसीकरणासाठी सज्ज झाला असतानाच लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी मोठी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करायला हवी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकारांशी बोलताना मांडले.

मलिका म्हणाले, लसीची प्रतीक्षा आता संपली आहे. आजपासून अवघ्या चारच दिवसांनंतर १६ जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सैन्यदलातील जवान यांना लस दिली जाणार आहे. यावर बोट ठेवत मलिक यांनी राष्ट्रवादीची मागणी पुढे केली आहे. करोनावरील लसीकरण सुरू होत असताना याबाबत जनतेच्या मनात शंका आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेतली तर जनतेच्या मनातील भीती निघून जाईल, असे नवाब मलिक यांनी नमूद केले आहे.

COMMENTS