मेट्रोच्या कारशेडवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार, केंद्राच्या पत्रावर मंत्री नवाब मलिक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया!   पाहा

मेट्रोच्या कारशेडवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार, केंद्राच्या पत्रावर मंत्री नवाब मलिक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया! पाहा

मुंबई – मेट्रोच्या कारशेडवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. नुकतंच केंद्राने याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं असून कांजूरमार्गची जागा एमएमआरडीयला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही असं म्हटलं आहे.

दरम्यान यावर मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडून मुख्य सचिवांना पत्र देण्यात आलंय, ती जागा मिठागराची आहे आणि ती चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे असं केंद्र सरकारचे म्हणणं आहे. केंद्र सरकारने 2002 साली मिठागराची अनेक जागा राज्य सरकारला हस्तांतरीत केल्या होत्या. आधी भाजपचे नेते म्हणत होते ही जागा राज्य सरकारची नाही तर खाजगी जमीन आहे, आता केंद्र सरकार म्हणतेय ही जागा आमची आहे. त्यामुळे भाजपला मेट्रोमध्ये अडथळा करायचा आहे का?, मेट्रोचे काम कसे थांबवायचे यासाठी भाजपकडून कटकारस्थान चालू आहे. तसेच याबाबत सर्व तपास करुन राज्य सरकार केंद्र सरकारला उत्तर देईल असंही मलिक यांनी म्हटलं आहे.

तसेच यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय राज्य सरकार हाताळत आहे. त्यामुळे यावर तेच प्रतिक्रिया व्यक्त करतील. राज्य सरकार त्यावर योग्यपद्धतीने काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जी टीका केली होती त्यावर विचारलं असतानाही त्यांनी विषयाला बगल दिली. हा विषय सरकारचा आहे सरकार बोलेल असंही त्यांनी सांगितलं.

मेट्रो कारशेडला  कांजूरमार्गला  हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. भाजपने  राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता.  पण, आता या वादात केंद्र सरकारनेही उडी घेतली आहे. केंद्र सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहे. याबद्दल केंद्राने राज्याच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवले आहे. कांजूरमार्गची जागा एमएमआरडीयला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही असं केंद्रानं म्हटलं आहे.

COMMENTS