राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाचा आता पाचवा टप्पा !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाचा आता पाचवा टप्पा !

मुंबई – राज्य आणि केंद्र सरकारविरोधात सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच पश्चिम महाराष्ट्रात हे आंदोलन करण्यात आलं आहे. त्यानंतर आता आंदोलनाचा पाचवा टप्पा ६ मेपासून कोकणातून सुरू होणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे हे आंदोलन टप्प्याटप्प्यात करण्यात येत असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात पालघर जिल्ह्यातून होणार आहे. ६ आणि ७ मे रोजी पालघर आणि ११ ते १३ मे रोजी ठाणे जिल्ह्यात हे आंदोलन पार पडणार असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे. तसेच १ ते ५ जून रोजी सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन होणार असल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान या आंदोलनात राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, विधानपरिषेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, यांच्यासह ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.

COMMENTS