पवारसाहेबांच्या नेतृत्वात आपल्याला रयतेचं राज्य आणायचं आहे – जयंत पाटील

पवारसाहेबांच्या नेतृत्वात आपल्याला रयतेचं राज्य आणायचं आहे – जयंत पाटील

मुंबई – आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वात आपल्याला रयतेचं राज्य आणायचं आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांना अध्यक्ष पदाचा पदभार सांभाळून एक वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल जयंतराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जनतेच्या विरोधात काम करून राज्याच्या कृषी, रोजगार आणि अर्थव्यवस्थेची वाट लावणार्‍या राज्यसरकारला जनतेच्या साथीने आपल्याला बदलायचे आहे असा आत्मविश्वासही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवराय व बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी आपल्या पक्षाची आहे आणि आपल्या मित्रपक्षांना सोबत घेवून आपण ती पार पाडूया. गेल्या वर्षभराच्या काळात मला साथ देणाऱ्या आपल्या पक्षाच्या सर्व नेत्यांचे आणि मला भरभरून प्रेम देणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी विशेष आभार मानले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी माझी निवड होवून आज एक वर्ष पूर्ण झाले. पक्षातील माझे सर्व सहकारी, पदाधिकारी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मी ही जबाबदारी पार पाडू शकलो असेही प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कारभार यशस्वीपणे सांभाळणारे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांना आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदी उपस्थित होते.

COMMENTS