…मग भाजपच ईव्हीएम बदला असे म्हणू लागेल – अजित पवार

…मग भाजपच ईव्हीएम बदला असे म्हणू लागेल – अजित पवार

कोल्हापूर – माझा ईव्हीएम मशीनवर विश्वास आहे, ईव्हीएमची काळजी करू नका, योग्य चिन्हांचे बटण दाबा मग भाजपच ईव्हीएम बदला असे म्हणू लागेल, असं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. कर्नाटक, पंजाब आणि अलीकडचे पाच राज्यांचे निकाल याच मशीनमधून आले आहेत. ते काँग्रेससह विरोधकांना अनुकूल ठरले आहेत. त्यानुळे माझा ईव्हीएम मशीनवर विश्वास असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीसह अनेक विरोधी पक्ष ईव्हीएम मशीनच्या सत्यत्येबाबत सातत्याने शंका उपस्थित करत आहेत.परंतु अजित पवार यांनी मात्र ईव्हीएम मशीनला क्लीनचिट दिली आहे. इचलकरंजी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मदन कारंडे यांच्या बालाजी नागरी सहकारी पतसंस्थाच्या रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारंभात पवार बोलत होते.

COMMENTS