त्यामुळे जितेंद्र आव्हाड पत्रकारांवर भडकले !

त्यामुळे जितेंद्र आव्हाड पत्रकारांवर भडकले !

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते  नेते जितेंद्र आव्हाड हे आज पत्रकारांवर चांगलेच भडकले होते. आव्हाड हे भगवदगीतेतील एक श्लोक म्हणताना अडखळले होते. ‘यदा यदा शी धर्मस्य’ असा उल्लेख त्यांनी केला. त्यावर पत्रकारांनी त्यांना तो श्लोक म्हणून दाखवा असं  म्हटले. त्यामुळे जितेंद्र आव्हाड चांगलेच पत्रकारांवर भडकले व तुम्ही इथे भाजापचे प्रवक्ते म्हणून आलात का? असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला. दरम्यान यानंतर त्यांनी खासगीत संपूर्ण गीता म्हणून दाखवण्याचे आव्हानही स्वीकारले.

दरम्यान मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवदगीता वाटप करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण मंडळातर्फे घेतला आहे. त्यावरून वाद सुरू झाला असून भाजपाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भगवदगीता वाटप करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली आहे. दरम्यान विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भगवदगीता वाईट आहे असं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवाद्यांनी जाहीर करण्याच आव्हान केलं आहे.

 

COMMENTS