मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत,  त्यांचा ‘हा’ प्रयत्न निव्वळ मूर्खपणा – जितेंद्र आव्हाड

मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत, त्यांचा ‘हा’ प्रयत्न निव्वळ मूर्खपणा – जितेंद्र आव्हाड

नवी दिल्ली – रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा. कोरोनाग्रस्त बांधवांना आपल्याला प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. त्यासाठी या प्रकाशाची ताकद दाखवायची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच यासाठी कोणालाही कुठेही एकत्र जमायचं नाही, रस्ते, गल्ली इथे जायचं नाही, सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पार करु नका असं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली आहे. लोकांची चूल कशी पेटेल, यावर साहेब बोलतील, असं वाटलं होतं, मात्र त्यांनी दिवा पेटवण्याचा संदेश दिला असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे. तर मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत आहेत, वाटलं होतं लोकांची चूल पेटवण्यासंदर्भात बोलतील, परंतु साहेब दिवा पेटवण्याचा संदेश देऊन गेले. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

तसेच आम्हाला वाटले, मोदी काहीतरी आधार देतील. काय उपाययोजना केल्या, याची माहिती देतील, किती औषधे, मास्क आहेत, डॉक्टरांना किती साहित्य देऊ, याची माहिती देतील. पण मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत आहेत. मोदी यांचा हा प्रयत्न निव्वळ मूर्खपणा असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

COMMENTS