“सुनील तटकरे आणि जयंत पाटील हे दोघं लबाड बोके !”

“सुनील तटकरे आणि जयंत पाटील हे दोघं लबाड बोके !”

अलिबाग – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व शेकापचे सरचीटणीस आमदार जयंत पाटील हे दोघे स्वार्थी व संधीसाधू राजकरणी आहेत. हे दोन लबाड बोके आहेत. त्यांच्यावर विश्वास कुणी ठेवूशकत नाही.  या दोघांची संस्थाने खालसा कारायची आहेत. या दोघांना राजकीयदृष्टया संपविल्याशीवय मी राजकरणातून निवृत्त होणार नाही, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी अलिबाग येथील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात केलं आहे.

अलिबाग-मुरड विधानसभा मतदारसंघ शिवसेना निर्धार मेळावा अलिबाग येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनंत गिते बोलत होते.  या निर्धार मेळाव्यात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी सुनील तटकरे व जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, हे दोघे स्वार्थी आहेत. भ्रष्ट आणि दृष्ट आहेत. ते स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. जनतेच्या हितासाठी ते एकत्र आले नाहीत. बुडत्याला काडीचा आधार तसा अलिबागला रोह्याचा आधार आहे. या दोघांच्या पायाखालची वाळू सटकली आहे. त्यामुळे त्यांचा तोल गेला आहे. ते आता बेताल बोलत आहेत.

शकापचे संस्थान खालसा होत चालले आहे. पूर्वी तीन आमदार होते. आता दोनच आमदार आहेत. पुढच्या निवडणुकीत एकही निवडून येणार नाही. अलिबाग आणि पेणची जागा शिवसेना जिंकणारच. शेकापची मक्तेदारी संपवणारच.  मला लोकसभेची चिंता नाही. माझ्याविरूध्द जयंत पाटील किंवा सुनील तटकरे दोघांपैकी कुणीही निवडणूक लढविण्याची हिम्मत करू शकत नाही. जंयत पाटील सांगतायत सुनील तटकरे हेच आमचे लोकसभेचे उमेदवार असतील पण स्वतः तटकरे मात्र  काहीच बोलत नाहीत. बेगाने शादीमे अबद्दुल्ला दिवाना अशी जयंत पाटलांची गत आहे, अशी टिका  गिते यांनी केली.

 

COMMENTS