महाराष्ट्रातून कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही- ठाकरेंचा इशारा

महाराष्ट्रातून कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही- ठाकरेंचा इशारा

मुंबई : महाराष्ट्र राज्य हे मॅग्नेटिक राज्य आहे. परदेश आणि देशातील गुंतवणूकदार,उद्योजकांना आजही महाराष्ट्राचे आकर्षण कायम आहे. येथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही. स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. पण कुणी ओढून ताणून येथून काही घेऊन जाणार असेल, तर ते शक्य होणार नाही’, असा इशारा यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला.
इंडियन मर्चंट चेंबर आॅफ काॅमर्सच्या वतीने ‘मिशन एंगेज’ या पुस्तिकेचे तसेच डिजिटल आर्ट या डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले. वेब माध्यमातून या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, आयएमसीचे अध्यक्ष राजीव पोद्दार यांच्यासह इतर उद्योजक उपस्थित होते. दरम्यान, उत्तर प्रदेशातील गुंतवणुकीचा संकल्प घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी रात्री मुंबईत दाखल झाले आहेत. या दौऱ्यात योगी हे बाॅलीवूड संबंधित गुंतवणूकदार व देशातील आघाडीचे उद्योजक तसेच उद्योगसमूहांशीही गुंतवणुकीवर चर्चा करणार आहेत.

ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राला एक इतिहास आहे. महाराष्ट्र एक सर्वार्थाने वेगळे राज्य आहे. इथे वेगळे संस्कार आहेत. त्यामुळे येथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही. स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. पण कुणी ओढून ताणून येथून काही घेऊन जाणार असेल, तर ते शक्य होणार नाही’,

महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक येते आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्रातील या बदलाचे ११३ वर्षे जुने साक्षीदार आहे. त्यामुळेच तुम्हीच महाराष्ट्राचे ब्रँड अॅम्बेसेडर आहात. महाराष्ट्राच्या यशाची गाथा, गोष्टी तुम्हीच इतरांना सांगू शकता. कुठलीही अडचण असेल, तर ती दूर करण्यात सरकार तुमच्यासोबत असते. हे तुम्हाला सांगता येईल. यामुळे महाराष्ट्रात देशभरातून नव्हे परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळेल. यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे दूत व्हावे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

COMMENTS