भाजपला मोठा धक्का, आणखी एका पक्षानं सोडली साथ!

भाजपला मोठा धक्का, आणखी एका पक्षानं सोडली साथ!

नवी दिल्ली – आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. आसाम गण परिषदेने (एजीपी) एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. एजीपी आसाममधील भाजपा सरकारमध्ये सहकारी पक्ष असून त्यांचे १४ आमदार आहेत. एजीपीने केंद्र सरकारकडून आणण्यात येणाऱ्या नागरिकत्व (संशोधन) विधेयकाला विरोध केला आहे. नागरिकत्व (संशोधन) विधेयक २०१६ संसदेत संमत झाले तर आपण राज्यातील आघाडीच्या सरकारमधून बाहेर पडू असा इशारा एजीपीने आधीच दिला होता. त्यानंतर एजीपीने आज एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान नागरिकत्व अधिनियम, १९५५ हे दुरूस्तीसाठी लोकसभेत सादर केले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून अल्पसंख्यक समाजातील लोकांना भारतात १२ वर्षांऐवजी ६ वर्षे वास्तव केल्यानंतरच नागरिकत्व प्रदान करण्याची मागणी केली आहे.या विधेयकाला अनेकांचा विरोध आहे.

COMMENTS