उस्मानाबाद – भाजप सरकार सर्वच पातळीवर अपयशी, काँग्रेसचे गटनेते शरण पाटील यांचा आरोप!

उस्मानाबाद – भाजप सरकार सर्वच पातळीवर अपयशी, काँग्रेसचे गटनेते शरण पाटील यांचा आरोप!

उस्मानाबाद – केंद्रातील तसेच राज्यातील सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे, त्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरण
पाटील यांनी केले आहे. नायगाव (ता. कळंत्र) येथे चलो पंचायत अभियानात बोलत होते. युवक काँग्रेसचे रोहित पडवळ, आग्निवेश शिंदे, शशिकांत निरफळ, पांडूरंग कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पाटील म्हणाले की, केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. शेती मालाला भाव नाही. महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव
गगणाला भिडले आहेत.कर्जमाफीचे केवळ गाजर दाखविले आहे. बडे उद्योगपती कर्ज घेऊन देशाबाहेर पळवून लावले. मात्र देशातील अनेक शेतकऱ्यांना
अद्यापही कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. राज्यातील सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. केवळ जातीय तनाव वाढवून जनतेमध्ये दुफळी निर्माण करून
सत्ता मिळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यावेळी पाटील यांनी भाजप आणि सेनेवर चौफेर टीका केली. सेनेच्या राजीनामा नाट्यावरही पाटील यांनी खरपूस
समाचार घेतला. युवा नेते विशाल पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

COMMENTS