त्या भितीमुळेच शरद पवारांनी उमेदवारांची घोषणा केली – पंकजा मुंडे

त्या भितीमुळेच शरद पवारांनी उमेदवारांची घोषणा केली – पंकजा मुंडे

मुंंबई – नेते-कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जात आहेत. त्या भितीमुळेच शरद पवारांनी उमेदवारांची घोषणा केली असल्याची टीका राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बीडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यावरुन त्यांनी ही टीका केली आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या बीड जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शरद पवारांनी यादी जाहीर करताना परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे, गेवराई येथून विजयसिंह पंडित, केज येथून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगाव येथून प्रकाश सोळंके यांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा परळी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा जोरदार सामना रंगणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान पवारांनी जाहीर केलेल्या या यादीवरुन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. लोक पक्ष सोडून जातील या भीतीने शरद पवार यांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच परळीतून आमदार मीच होणार असल्याचा विश्वासही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS