घटना दुरुस्ती करुन मराठा आरक्षण द्या –शरद पवार

घटना दुरुस्ती करुन मराठा आरक्षण द्या –शरद पवार

मुंबई –  घटना दुरूस्ती केली तर मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. घटना दुरुस्ती करण्याचा निर्णय जर केंद्र सरकारने घेतला तर विरोधकांना त्याची गरज मी समजावून सांगतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरूस्ती करणे शक्य असून याबाबतचा निर्णय केंद्र सरकारनं घ्यावा अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे. कोल्हापुरातील दसरा चौकात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनात शरद पवार बोलत होते.

दरम्यान यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली असून वारीत साप सोडण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले त्यामुळेच मराठा समाजातील आंदोलक अधिक आक्रमक झाले असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच आंदोलन शांततेत सुरू असताना सत्ताधाऱ्यांनी बेजबाबदार वक्तव्यं करून आगीत तेल ओतले असंल्याचंही पवारांनी म्हटलं आहे. भाजपाने सत्तेवर येताच शंभर दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ अशी भूमिका घेतली होती. आता न्यायालयीन प्रक्रिया पुढे करून मराठा आरक्षण लांबवणे योग्य नसल्याचंही पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

COMMENTS