कीटकनाशक विषबाधा प्रकरण; 5 कंपन्यांविरुद्ध नागपूरमध्ये एफआयआर दाखल 

कीटकनाशक विषबाधा प्रकरण; 5 कंपन्यांविरुद्ध नागपूरमध्ये एफआयआर दाखल 

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकामुळे विषबाधा झाल्याने काही शेतकर्‍यांचे मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर केंद्रीय कॉटन रिसर्च इन्स्टिट्युटने सखोल अभ्यास करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. या अहवालात नमूद असल्याप्रमाणे 5 नामांकित कंपन्यांच्या बीटी कॉटन बियाण्यांमध्ये ‘हर्बिसाईड टॉलरन्ट जीन्स’ आढळून आले आहेत, जे पर्यावरण संरक्षण कायदा 1986 मधील तरतुदींनुसार नाहीत. या पाचही कंपन्यांविरूद्ध नागपूर येथे एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तथापि अनेक राज्यांमध्ये अशाप्रकारच्या बियाण्यांचे उत्पादन होत असल्याने याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे.

 

 

COMMENTS