“आतापर्यंत एकाही पंतप्रधानाला जमले नाही ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले !”

“आतापर्यंत एकाही पंतप्रधानाला जमले नाही ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले !”

कझाकिस्तान – आतापर्यंत एकाही पंतप्रधानाला जमले नाही ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले असल्याचं वक्तव्य भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यापासून ते डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत कोणालाही अनिवासी भारतीयांशी प्रभावीपणे संवाद साधता आला नाही परंतु मोदी सरकारने हे करुन दाखवलं असल्याचं सुषमा स्वराज यांनी कझाकिस्तानमधील भारतीय जनसमुदायासमोर म्हटलं आहे.

दरम्यान भाजपने अनिवासी भारतीयांविषयी जी आस्था दाखवली, ती यापूर्वी कधीच दिसली नव्हती. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून ते डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी विदेशातील भारतीय जनसमुदायासाठी सभा घेतल्या नाहीत. तसेच भारतीय परराष्ट्र मंत्रालय अनिवासी भारतीयांच्या मदतीसाठी २४ तास उपलब्ध असून विदेशातील भारतीय दूतावासांसाठी मी ‘होम अवे फ्रॉम होम’ हे उद्दिष्ट ठरवलं असल्याचं स्वराज यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS