…तर मी झोळी उचलून कधीही निघायला तयार – पंतप्रधान मोदी

…तर मी झोळी उचलून कधीही निघायला तयार – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – भाजपचा पराभव होणार नाही हेही तितकेच सत्य आहे. पुन्हा देशात आमचेच सरकार येईल. जनतेचा भाजप पक्षावर पूर्ण विश्वास आहे. परंतु तुम्ही म्हणता तसं लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर मी झोळी उचलून कधीही निघायला तयार असेन असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलत असताना विरोधकांवरही जोरदार टीका केली. 2014 च्या तुलनेत यावेळी भाजपच्या जागा वाढणार आहेत. तसेच सत्ता स्थापन करण्याचे स्पप्न पाहणाऱ्यांचे स्वप्नभंग होणार असल्याचंही मोदींनी यावेळी म्हटलं आहे. परंतु आमचा पराभव झाला तर
मी झोळी उचलून कधीही निघायला तयार असेन, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS