“मोदींना पंतप्रधानपदाचा इगो, 20 पैकी एकाही पत्राचं उत्तर दिलं नाही !”

“मोदींना पंतप्रधानपदाचा इगो, 20 पैकी एकाही पत्राचं उत्तर दिलं नाही !”

सांगली – पंतप्रधान मोदींना आतापर्यंत 20 पत्र लिहिली परंतु एकाही पत्राचं उत्तर अजून मिळालं नसल्याचं वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलं आहे. शेतकरी प्रश्नावर 10 तर लोकपाल बिल कमजोर करून पास केल्याबद्दल पंतप्रधान याना 20 पत्रे लिहिली असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.त्यामुळे पंतप्रधान मोदींना बहूतेक इगो आला असेल म्हणून ते उत्तर देत नसतील असं अण्णांनी म्हटलं आहे.

दरम्यान लोकपाल विधेयक चर्चा न करता एका दिवसात लोकसभेत तर दुसऱ्या दिवशी राज्यसभेत पास केलं. तुमचे मन स्वच्छ नसेल तर मन की बात कशाला करता असंही आण्णांनी म्हटलं आहे. स्वामिनाथन आयोग आम्ही लागू करू असे पंतप्रधान निवडणुकीपूर्वी म्हणत होते, पण तीन वर्षे गेली अजून काहीही केले नाही, यांना धन दाडग्यांची कदर आहे, पण शेतकऱ्यांची नाही. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे अशी मागणीही त्यावेळी अण्णांनी केली आहे.

COMMENTS