…तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी व्हायला वेळ लागणार नाही – प्रकाश आंबेडकर

…तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी व्हायला वेळ लागणार नाही – प्रकाश आंबेडकर

मुंबई – आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून शिसेनेकडून प्रोजेक्ट केल जातंय. त्यामुळे ते आता मुख्यमंत्री झाले पाहिजेत. जर ते मुख्यमंत्री झाले नाहीत तर त्यांचा राहुल गांधी व्हायला वेळ लागणार नसल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमुळेच आदित्य ठाकरे यांचा राहुल गांधी होईल असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच आदित्य यांचा राहुल गांधी होऊ नये यासाठी शिवसेनेने मेहनत घेणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा मुद्दा सोडून देऊ नये शिवसेनेनं जर असं केलं तर त्यांचा राहुल गांधी झाल्याशिवाय राहणार नाही. आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होऊ द्यायचं नसेल तर त्यांनी तो मुद्दा रेटून धरला पाहिजे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS