मानव हक्कांसाठी काम करणाऱ्या वकिलांवर केलेली कारवाई बोगस  – प्रकाश आंबेडकर

मानव हक्कांसाठी काम करणाऱ्या वकिलांवर केलेली कारवाई बोगस – प्रकाश आंबेडकर

मुंबई – कट्टर हिंदुत्ववादी सनातन संस्थेवरील लक्ष हटवण्यासाठीच मानव हक्कांसाठी काम करणा-या वकीलांवर कारवाई करण्यात आली असून ही कारवाई बोगस असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या नावाखाली पुणे पोलिसांकडून देशभरातील डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात आहे परंतु ही कारवाई बोगस असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सरकारने आपली सहानुभूती गमावली असून डॅमेज कन्ट्रोल करण्यासाठी त्यांचे आता प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच हे लोक सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीच्या उद्दीष्टप्राप्तीसाठी अडथळा ठरतील अशी भीती सरकारला आहे. तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या २०१३ मध्ये झालेल्या हत्या प्रकरणासह इतर अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सनातन संस्थेचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे या संस्थेवरील चौकशीचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पोलिसांनी आता निरपराध पुरोगामी कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई सुरु केली असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS