…तर मी शरद पवारांच्या प्रचाराला गेलो असतो – प्रकाश आंबेडकर

…तर मी शरद पवारांच्या प्रचाराला गेलो असतो – प्रकाश आंबेडकर

मुंबई – नागपुरात भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यात लढत झाली. परंतु माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जर नागपुरातून निवडणूक लढली असती, तर मी त्यांच्या प्रचाराला गेलो असतो असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीनं मला पाडायची रणनीती आखली असल्याचा आरोपहा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर पहिल्यांदा प्रश्न उभे राहिलेत. निवडणूक आयोगाची आधीची भूमिका आणि आताची भूमिका यात तफावत आहे. ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकते, यापूर्वीही असं घडलेलं आहे, असे सांगत प्रकाश आंबेडकरांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडी लढवलेल्या सर्वच्या सर्व जागा जिंकेल, असा विश्वासही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान आम्हाला बी टीम म्हणून हिणवलं गेलं, पण आम्ही आमची मतं मिळवणार आणि जरी काँग्रेसनं आमचा खिमा केला, तरी आम्ही धर्मनिरपेक्ष ताकदीबरोबर राहणार.” तसेच, ना भाजप, ना काँग्रेस, प्रादेशिक पक्षांना या निवडणुकीनंतर महत्त्व असेल, असा अंदाज प्रकाश आंबेडकरांनी वर्तवला आहे.

COMMENTS