प्रकाश  मेहता, सुभाष देसाई यांच्यानंतर आणखी दोन मंत्री विरोधकांच्या रडारवर !

प्रकाश  मेहता, सुभाष देसाई यांच्यानंतर आणखी दोन मंत्री विरोधकांच्या रडारवर !

चंद्रपूर – पावसाळी अधिवेशन गाजलं ते गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन. विरोधी पक्षांनी ही दोन्ही प्रकरणे दोन्ही सभागृहात लावून धरली. त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेलं. त्यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चौकशीत आता काय होतं ते पहावं लागेल, मात्र सरकरच्या इमेजवर त्याचा परिणाम झाला हे नक्की.

देसाई आणि मेहता यांच्यानंतर आता आणखी दोन मंत्री विरोधकांच्या रडारवर आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात या दोन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी यांनी दिला आहे. त्यांची नावं सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे. त्यामळे ते दोन मंत्री कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे.

COMMENTS