मराठा आरक्षणाचा विषय पुढील दोन वर्ष तरी सुटणार नाही, त्यामुळे शालेय प्रवेश आणि रखडलेली नोकरभरती तात्काळ सुरू करा – प्रकाश शेंडगे VIDEO

मराठा आरक्षणाचा विषय पुढील दोन वर्ष तरी सुटणार नाही, त्यामुळे शालेय प्रवेश आणि रखडलेली नोकरभरती तात्काळ सुरू करा – प्रकाश शेंडगे VIDEO

मुंबई – मराठा आरक्षणाचा विषय लवकर सुटणार नसल्याने राज्य सरकारने शालेय प्रवेश आणि रखडलेली नोकरभरती तात्काळ सुरू करावी अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. मराठा आरक्षण स्थगिती उठवण्याबाबत आज न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला आहे, घटनापिठही अद्याप स्थापन झालेले नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय पुढील दोन वर्ष तरी सुटणार नाही. याचा विचार करुन राज्य सरकारने स्थगिती दिलेले प्रवेश सुरू आणि थांबलेली नोकरभरती सुरू करावी अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

COMMENTS