पृथ्वीराज चव्हाण जास्त काळ ‘माजी’ मुख्यमंत्री राहणार नाहीत –  राजू शेट्टी

पृथ्वीराज चव्हाण जास्त काळ ‘माजी’ मुख्यमंत्री राहणार नाहीत – राजू शेट्टी

सांगली – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याला खासदार राजू शेट्टी यांनी दुजोरा दिला आहे. मोदी सरकार अपयशी ठरलं असून 2019 मध्ये आम्हीच सत्तेवर येणार आहोत, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याला राजू शेट्टी यांनी दुजोरा दिला असून चव्हाण हे जास्त वेळ ‘माजी’ राहणार नाहीत ते लवकरच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याची खात्री राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मला सगळं कळतं तसेच मी सगळं करणार, हा अहंकार चांगला नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच देशातील वाढती महागाई, शेतकरी आत्महत्यांवरही बोलत असताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारनं फक्त पोकळ अश्वासनं दिली असून याचा फटका त्यांना आगमी निवडणुकीत बसणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS